सोमवार, ३० जून, २००८

सध्या नविन गोष्टीची ओळख झाली आहे... गोष्ट म्हणजे एक नवा अनुभव.. ऐकायला वाचायला नवा नसेल कदाचित पण कधी कोणी अश्या अनुभवातुन जाऊ नये अस वाटतय... एकटे पणा आम्ही मस्त उपभोगु शकतो आनंदाने.. नविन जगण्याचा प्रयत्न करत.. कधी थकतोही थांबतो.. परत त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो... हे चक्र चालु राहतच.. कारण आयुष्यात निराळ अस काही घडत नव्हतं... पण मागच्या आठवड्यात अचानक एक चान्गली बातमी कानावर आली आणि तिही माझ्या बाबतीत.. आमची बढती झाल्याच कळल.. आनंद झाला खूप... काम सुरु झाल तेव्हाचा आनंद तर झुप समाधान मिळाल... वाटल हे सगळ आपल्या कोणाला तरी सांगाव .. ऐइची आठवण आली.. पण तिथ पर्यत फोनही पोहचत नाही... पण तरी तिच्या पर्यत ही गोष्ट पोहचली असावी... पण हात आपसुक मोबाईल कडे वळला.. त्यांना फोन करावा नाही नको समस पाठवावा.. हो नाही म्हणता म्हणता smsपाठवला काही उत्तर नव्हत.. आता या वेळेस खुप गरज होती त्यांच्या नुसत्या उत्तराची नव्हे तर त्यांच्या सोबतीची.. दुसर्‍यादिवशी उत्तर मिळाल.. त्यांनाही खुप आनंद झाला होता म्हणे.. पण .. असो त्यातच समाधान वाटुन घ्याव नाही का? माणसाच दुःख sमस करायला कोणी असो वा नसो निदान सुखात तरी कोणीतरी असावच नाहितर त्याहुन दुःख कोणतच नाही..असो निदान मी तरी याच्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतेय.. आणी गाण गुणगुणतेय '' हर पल यहॉ जी भर जियो.. जो है समा कल हो ना हो''